Wednesday, 31 October 2018

Statue of unity

Statue of unity सरदार वल्लभ भाई पटेल यांचा भव्य दिव्य पुतळा उभारल्यानंतर काही स्वयंघोषित बुद्धिजीवी पुरोगामी म्हणतायत की पुतळ्यावर ३ हजार करोड कशाला खर्च केले ,  तिकडे चीन पाहा परवाच समुद्री मार्गातून ५० की.मी चा पुल बांधलाय तस काही केलं असत तर बरं झालं असत(समुद्रातून पुल काय तुमच्या घराच्या दरवाज्यापर्यंत करायचा होता का ? ), काही म्हणतात की त्या पैस्यांच विद्यापीठ केलं असत तर वैज्ञानिक बाहेर पडले असते. असे अनेक जण आपली मते नोंदवत आहेत. आज पर्यंत स्वतंत्रता एका परिवाराची जहागिरी समजल्या जाणाऱ्याला घराण्याला statue of unity हे  चाप आहे. आणि स्वयंघोषित बुद्धिजीवी पुरोगामींनी मत मंडण्यापेक्षा निवडणूक लढवावी, त्या पदापर्यंत पोहोचावे व नंतर त्यांना समुद्रात पुल काय, भारत पाण्याखाली घालून सगळी कडे जहाजाची व्यवस्था करावी, पण तुम्ही फक्त मत मांडणार  आणि हे बिकाऊ मीडिया आणि तुमचे वैचारिक झालेले गुलाम विरोध करणार पण त्यामागची भूमिका काय आहे हे कोणी समजून घेणार नाही, ज्या सरदार वल्लभभाई पटेलांमुळे आज भारत देश एकत्र आहे त्यांचं स्मारक भव्य दिव्यच असायलाच हाव ना.
  दुःख फक्त एका गोष्टीचं वाटत की त्रिपुरा तील   लेनिनचा पुतळा पाडला तेव्हा बुद्धिजीवी टीका करतात जो मूळ भारतीय नाही आणि एकीकडे भारत भूमी पुत्र सरदार वल्लभ भाई पटेल जे की भारतातील सर्व संस्थांना भारतात विलीन करुन भारताला नवा जन्म देण्याचं काम केलं, एकत्रित ठेवण्याचं काम केलं यांना तुम्ही विरोध करताय. २०१९ ला मत व्यक्त करण्यापेक्षा स्वतः निवडणुकीला उभारा आणि दोन हाथ करा.

निखिल हुंडेकर

Tuesday, 30 October 2018

हिंदुत्ववादी अतिरेकी

पाच सहा दिवसाखाली लोकसत्ता व महाराष्ट्र टाईम्स वर्तमान पत्रावर कट्टर हिंदुत्ववादी अतिरेकी हा शब्द वाचलो आणि संसदेवर झालेला हल्ला, २६/११ हल्ला, कश्मीरमधील दहशतवाद,घुसखोरी,ईसिस,तालीबान,सिमी,आसाम, बंगालचे वातावरण, अधून मधून सापडलेले अतिरेकी अश्या सर्व माहीती, वर्तमानपत्रातील बातम्या, टलेव्हीजनवरील बातम्या डोळ्यासमोर आल्या. फरक फक्त येवढा होता की इस्लामी अतिरेकी हा शब्द सहसा वाचला नाही, कारण अतंकवाद्यांना धर्म नसतो ना ! आज जगात इस्लाम खतरेमे म्हणून अतंकवाद माजवत आहेत पण त़्यांना अतंकवादी म्हणायला कोणी पुढे येत नाही मग प्रशन पडतो की खरच हिंदु एका ठराविक चौकटातला धर्म आहे का?  हिंदु धर्मामध्ये स्त्रीयांना दु़य्यम स्थान देनारा तसेच धार्मिक स्वातंत्र्यता नसनारा धर्म आहे का? 
काही दिवसापुर्वी शाळांमध्ये भगवत गिता पाठ्यक्रमात घेन्यावरून वाद निर्मान झाला,तेव्हा जितेद्र अव्हाड साहेबांना पत्रकारांसमोर  गितेतील श्लोक म्हणता आला नाही,  त्यावर त़्यांची सगळ्यांनी टर उडवली हा भाग वेगळा पण इतर धर्मात असे झाले असते तर साहेबांविरूद्ध फतवा निघाला असता. सांगायच येवढच की,  हिंदु धर्मात स्वातंत्र्यता आहे. काही लोक शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी तरीही ते हिंदु आहेत. काही अस्तिक तर काही नास्तिक आहेत तरी ते हिंदु आहेत. कोणी पांडूरगाचा पुजा करत तर काही तुळजाभवानीची करतात तरी ते हिंदु आहेत, प्रत्येकाची पुजा करन्याची पद्धत वेगळी तरी ते हिंदु आहेत. राहीला प्रश्न स्त्रीयांचा तर स्त्रीयांना घरची लक्ष्मी म्हणतात, ज्या भुखंडावर आपण राहतो त्या भारताला आपण माता म्हणतो. गेल्या काही कालखंडामध्ये काही चुकीच्या रूढी परंपरा होत्या पण कालानरूप हिंदु धर्माने बदल घडवून आनले. जातीपाती भेदाबद्दल सांगा़यच झाल तर गेल्या काही वर्षात या कमी कमी होत चालल्या आहेत. याचे उदाहरण म्हणजे आपण जेव्हा बस, रेल्वे मधे बसतो तेव्हा आपण हे पाहत नाही की, बाजूवाला कोणत्या जातीचा आहे. म्हणजेच जातपात नजरेतून गेली आहे, आता आहे ते फक्त मनात. आणि अगोदर म्हटल्याप्रमाने हिंदु धर्मामधे कालानरूप बदल घडतो यामुळे विश्वास वाटतो की एक दिवस मनामधूनही जातीपाती नष्ट होतील. त्यामुळे हिंदु धर्मावर कोणी काही बोलल़्याने काही फरक पडत नाही. कारण हा धर्म मुळात सर्वांना स्वातंत्र्य देतो.
-निखील हुंडेकर

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो  त्यास आम्ही भिडनार...  परकीय वा असो स्वकीय आमुचे   त्यास आम्ही नडणार.. हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची  ...