Wednesday, 18 September 2019

गोष्ट एका पिढीची


१९५०-७० या दशकात जन्म घेतलेल्या पिढीने जे अनुभवलय तेच खर जिवन.या दशकात पैसा, नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक प्रमाणात असली, तरी गरीबी कायम पाठीशी उभीच होती. देशाला स्वातंत्र्य भेटून जेमतेम १०-२० वर्ष झालेे होते. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय ? लोकशाही काय आहे ? हे बहुसंख्य समाजाला माहीत नव्हते. भारत  काँग्रेसमुळे स्वातंत्र्य झाला आहे आणि ते  म्हणतील ती पुर्व दिशा, या विश्वासावर वाढलेली हि पिढी...
  त्या काळी शिक्षणाची योग्य ती सोय नाही रोजगार नाही पण शेती मुबलक प्रमाणात असल्यामुळे शेतीकडे ओढ असलेली ही पिढी. इंग्रज गेले पण जाताना त्यांचे विचार रूजवून गेले त्यामुळे त्या काळात वतनदार, धनदांडगे, इंग्रज जाताना त्यांची मालमत्ता  घेणारे चाकर व इंग्रजांची राहनीमान, शान शौकत पाहीलेले, अश्या लोंकांची मुलं चांगल्या शाळेत  महाविद्यालयात शिक्षण घेत  होती, आणि बाकी ठिकाणी शाळेत महाविद्यालयात जायच म्हटल तर २०-२२ कि.मी चालत जाव लागायच.
   शिक्षण क्षेत्र तसेच इतर क्षेत्रातही होणारे नव नविन बदल जनसामान्यांपर्यंत पोहचत नव्हते, तसेच पाहीजे ती जनजागृतीही होत नसत त्यामुळे सहाजिकच लोकांची ओढ शेतीकडे होती. शेती जरी भारतीयांचा प्रामुख्याने व्यवसाय होता, तरी त्या काळात शेतात वापर होणारे नव नविन अधुनिक तंत्रग्यान याबाबतही सरकार उदासिन होते.तसेच पुर्वी तांबे, जर्मन या धातूंचे चलन अस्तित्वात होते, तेव्हा ते पैसे वितळवून भांडे तयार करत असत, मग प्रश्न पडतो की या पिढीला अडाणी ठेवण्याचे काम कोणी केले ?  सुटा बुटात तोंडात बिडी ठेवून गरिबी हटाव म्हणत प्रगत भारताचे भंपक स्वप्न दाखवले गेले पण प्रत्यक्षात जनपातळीवर काम शुन्यच. ही पिढी इंग्रजांची गुलामी सोडून स्वतंत्र भारतातील पहील्या पक्षाच्या गुलामीत जिवन जगत होते. लोकप्रतिनिधी आपले घर भरण्यात व्यस्थ होते, तर हि पिढी फक्त पाहत होती. हि पिढी भोळी व सहनशिल, म्हणजे त्याकाळी लोकप्रतिनिधी कींवा मंत्री संत्री किंवा सावकारांचे अनैतिक प्रेमप्रकरण समोर आले कि या पिढीतील लोकांचे एक सुंदर उत्तर असायच " यांनी नाही करायच तर कोण करायच".
या पिढीने सामाजिक व मानसिक दृष्ट्या खुप सहन केलयं. यांच आयुष्य फक्त कष्ट करन्यात गेलं, ज्यांच्याकडे पैसा होता त्यांच मिरवन्यात गेलं. त्या काळातल्या सरकारने विकास केला पण जनतेला स्वावलंबी न बनवता  नेहमी परावलंबी जिवन जगण्याची देन दिली.त्यामुळे ह्या पिढीने नेहमी स्वताला शोषीत घटकच मानल आहे. पण कष्ट कस करांयच अपमान कस पचवायचा, प्रतिकूल परिस्थितीत कस वावरायच, अपयश पचवून पुन्हा  नव्यान कस उभारायच आणि दिलेल्या शब्दाला आणि नात्याला कस योग्य राहायच हे या पिढीकरून शिकायला हवं.

-निखील हुंडेकर

Thursday, 28 March 2019

जल जागरूकता

धर्म, जात, भाषा, प्रांत या मुद्द्यांवरुन नाही पुढचे महायुद्ध पाण्यासाठी होईल असे अभ्यासक सांगतात. उन्हाळा आला रे पाणी जपून वापरा, गाडी एक बकेट मधे धुवा, पाणी सांडू नका, एका बादलीतच अंघोळ करा, उन्हाळ्यात बांधकाम करू नका असे सल्ले अनेक सामाजिक संस्था, पाण्या विषयी चिंता करणारे सामाजिक कार्यकर्ते  देत असतात, यामुळे कोणाच्या मनावर परिणाम होतो का ? होत असेलही पण फक्त उन्हाळा पुरताच मर्यादित, त्यानंतर पावसाळा आला की ही सर्व जल जागरूकतेची चळवळ मुळा-देठा पासून बंद होते, पण्यासंदर्भात जागरूकता ही प्रत्येकाच्या मनात व कृतीत पाहिजे तेव्हाच जलसंकट कायमचे दूर होणे शक्य आहे. भारतामध्ये भूगर्भात असलेल्या पाण्यासंदर्भात कठोर नियम/कायदे आहेत पण ते कोणीही पाळत नाही, नेहमी फक्त सरकारनेच पाण्याबाबतीत जबाबदारी घ्यावी हे चुकीचं आहे; येथे प्रत्येकाची जबाबदारी आहे पाणी जपून मोजून वापरण्याची! पण दुष्काळजन्य परिस्थिती गेल्यानंतर पहिला पाढा पंचावन्न अशीच परिस्थिती आपल्याकडे आहे. गेल्यावर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र धाराशिव येथे जल व भूमी व्यवस्थापन विभागात शिकत असताना प्रा.डॉ.नितीन पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली   Study of sewage water management of Osmanabad city या विषयावर अभ्यास करून शोधप्रबंध तयार केला.  या विषयाचा अभ्यास करताना 248 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले, सर्वेक्षणा मध्ये एक प्रश्न असा  होता की  आपल्या व्यक्तीगत  जीवनात व्यक्तीपरत्वे किती पाणी लागते (लिटर मधे उत्तर द्यायचं होतं) पण ९०% लोकांना आपण प्रतिदिन किती पाणी वापरतो हेच माहित नव्हत हे दुर्दैवच म्हणावे लागेल, मग  प्रश्न पडतो की पाण्यासंदर्भात जनजागृती करून काही उपयोग आहे का ? जो पर्यंत पाणी वापराबद्दल प्रत्येकाची मानसिकता कायमस्वरूपी बदलणार नाही तो पर्यंत हा प्रश्न ज्वलंतच राहणार. उन्हाळा, पावसाळा  किंवा हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये पाणी जपूनच वापरायला हवे. यासाठी प्रत्येकाला आपल्या जिल्ह्यात तालुक्यात आणि गावात सरासरी  किती पाऊस पडतो हे माहीत असणे आवश्यक आहे, पाणी जपून व मोजून वापरण्याची जाण असणे आवश्यक आहे. खरोखरच जनजागृती करायची असेल तर शाळेत शिकवल्या जाणारा पर्यावरण विषय ओबड धोबड न शिकवता व्यवस्थित शिकवला पाहिजे तसेच त्यामध्ये  जिल्ह्यातील वातावरण, जिल्ह्यातील ऋतु, पावसाळी दिवस, पाऊस किती पडतो, पाऊस कसा मोजायचा  पाणी कसे मोजायचे, रोज पाणी किती वापरायचे आणि कसे वापरायचे याच  शिक्षण व प्रशिक्षण मुलांना देणे गरजेचे आहे कारण  बाल मनावर पाण्याचे योग्य संस्कार करणे शक्य असते.  येणारी पिढी ही लहानपणापासून प्रशिक्षित होईल व भविष्यात ही पिढी  जलदुत म्हणून आपल्या जिल्ह्यात स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करतील. जलसंवर्धन, जलजागृती ही काळाची गरज आहे. जल शीतल आहे पण जेव्हा दुष्काळ असतो तेव्हा परिस्थिती भीषण होते. पाणी प्रश्न पेटतो, जनतेला असहाय्य वेदना होतात हे थांबवण्यासाठी जलसाक्षरता गरजेची आहे.

निखिल हुंडेकर

*राष्ट्रास*

राष्ट्राचा विनाश करी जो  त्यास आम्ही भिडनार...  परकीय वा असो स्वकीय आमुचे   त्यास आम्ही नडणार.. हे राष्ट्र आमुचे ही माती आमुची  ...